दृष्टी आणि ध्येय
- अहिल्यानगर ग्रामीण क्षेत्रामध्ये मुलभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर, व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
- विविध बचत गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपक्रम चालविणे.
- विविध घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.
- प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.